More on this book
Community
Kindle Notes & Highlights
एखाद्याच्या मेंदूच्या नव्हे, तर त्याच्या विचारांच्या आकारावर त्याचं यश ठरत असतं,
‘जास्त काळ लहान राहण्यात घालवण्याएवढं आपलं आयुष्य मोठं नाही.’
ज्या माणसाला आपण एखादी गोष्ट करू शकतो असा विश्वास असतो, त्याला ती गोष्ट करणं जमतंच.
तुम्हाला यश मिळणारच, असा ठाम विश्वास मनात बाळगा, यश तुमचंच आहे.
‘ठीक आहे, मी प्रयत्न करून बघतो, पण मला नाही वाटत हे होईल’, ही मनोभूमिका अपयशाला जन्म देते.
शेवटी, यशासाठी पुढाकार घेणं हा गुण आवश्यक आहे
स्वतःवर विश्वास ठेवा, चांगल्या गोष्टी घडायला आपोआप सुरुवात होईल.
तुमच्या बुद्धिमत्तेच्या प्रखरतेपेक्षा तिला दिशा देणारे तुमचे विचार अधिक महत्त्वाचे आहेत.
१२० बुद्ध्यांक, पण नकारात्मक, निराशावादी आणि असहकार्यपूर्ण माणसापेक्षा सकारात्मक, आशावादी आणि सहकार्याची मनोभूमिका असेल, तर १०० बुद्धयांक असलेला माणूस जास्त पैसा, मान आणि यश साध्य करेल.
(त्यांना जबाबदारी अंगावर घेण्याची भीती वाटते). ते अविवाहीत राहिले (अनेक विवाहांचा शेवट घटस्फोटातच होतो असं त्यांना वाटतं). त्यांना मित्र फारसे नाहीत (लोकांचा त्यांना कंटाळा येतो).
प्रत्यक्ष कृतीनं भय नाहीसं होतं, द्विधा मनःस्थिती, चालढकल या गोष्टी भीतीला उलट खतपाणीच घालतात.
अयशस्वी लोक एका अर्थी या गोष्टी मनाला लावून घेत असतात. अप्रिय प्रसंग ते मनात सारखे घोळवत राहतात आणि त्यांना आपल्या स्मरणशक्तीत मोक्याची जागा बहाल करतात.
खरंतर मुळात तो एक सज्जन मनुष्य असेल. बहुतेक माणसं सज्जनच असतात.
पुढच्या वेळी कुणी तुमच्याशी भांडण करायला सुरुवात केली, तर ही दोन छोटी वाक्यं लक्षात ठेवा. तुमचा राग आवरा. अशा प्रसंगी समोरच्या व्यक्तीला त्याची वाफ पूर्णपणे बाहेर काढू दया, आणि मग ते सगळं विसरून जा. ते अधिक श्रेयस्कर होईल.
कृती ही भावनांची नांदी असते, हे लक्षात ठेवा.
१. नेहमी पुढच्या रांगेतच बसा.
२. दृष्टीला दृष्टी भिडवण्याचा सराव करा.
३. तुमच्या चालण्याची गती साधारणपणे २५ टक्क्यांनी वाढवा.
४. संभाषणांत भाग घेण्याचा सराव करा.
तुम्ही हजर असलेल्या प्रत्येक व्यावसायिक परिषद, समिती बैठक आणि सामाजिक व्यासपीठावर उत्स्फूर्तपणे काहीतरी बोला. याला अपवाद करू नका. एखादा शेरा मारा, एखादी सूचना मांडा, एखादा प्रश्न विचारा. आणि हो, सगळ्यांत शेवटी बोलू नका. बोलणारा पहिला माणूस ठरण्याचा प्रयत्न करा.
५. मोठ्ठं स्मित करायला शिका.
भव्य विचार करणारे लोक, त्यांच्या स्वतःच्या आणि इतरांच्याही मनात सकारात्मक, पुरोगामी आणि आशादायक चित्रं निर्माण करण्यात निष्णात असतात.
तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी मोठ्या, सकारात्मक आणि आनंददर्शक शब्द व वाक्प्रचारांचा वापर करा. कुणी तुम्हाला विचारलं, ‘काय, कसं काय वाटतंय?’
इतर लोकांबद्दल बोलताना चांगल्या, आनंददर्शक आणि अनुकूल शब्द व वाक्प्रचारांचा वापर करा.
इतरांना प्रोत्साहन देण्याकरता सकारात्मक भाषेचा प्रयोग करा. संधी मिळताच लोकांचं व्यक्तिगतरित्या कौतुक करा.
आपली योजना सहकाऱ्यांना समजावून सांगताना सकारात्मक शब्द वापरा. ‘एक चांगली बातमी आहे. आपल्याला एक छान संधी चालून आली आहे’
तात्पर्य : कुठल्याही गोष्टीकडे, ती सध्या कशी आहे यापेक्षा, कशी असू शकते याकडे बघा. कल्पनाशक्ती कुठल्याही गोष्टीचं मूल्य वाढवते. भव्य विचार करणारा मनुष्य, भविष्यात काय करता येईल याचं कल्पनाचित्र नहेमी रंगवत असतो. तो वर्तमानात अडकून पडत नाही.
‘मी माझं काम करतोय् ना, मग पुरे!’ ही मानसिकता लघु आणि नकारात्मक विचार करण्याची आहे. भव्य विचार करणारे स्वतःला सांघिक प्रयत्नांतले भागीदार समजतात, ते व्यक्तिगतरित्या नव्हे, संघाबरोबरच यशस्वी किंवा अयशस्वी होतात.
तो ज्या विषयावर बोलणार आहे, त्या विषयाचं उत्तम ज्ञान आणि ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याची तीव्र इच्छा.
शेकडा किमान ९९ वेळा, भांडणांची सुरुवात छोट्या, किरकोळ कारणामुळे होत असते. कुणी महाशय अंमल थकून, भागून आणि किंचित चिडचिडं होऊन घरी येतात. आजचं जेवण त्यांना फारसं आवडत नाही, म्हणून ते नाक मुरडून त्याबद्दल तक्रार करतात.
तक्रार करण्यापूर्वी किंवा समोरच्या व्यक्तीवर दोषारोप करण्यापूर्वी, तिच्यावर ठपका ठेवण्यापूर्वी किंवा स्वतःच्या बचावासाठी प्रतिहल्ला चढवण्यापूर्वी, स्वतःला एक प्रश्न विचारा, ‘ही गोष्ट एवढी महत्त्वाची आहे का?’
‘क’ ला ती छोटी केबिन मिळाली. या गोष्टीमुळे ‘क’चा अभिमान दुखावला. तेवढ्यावरून आपल्याबाबतीत भेदभाव केला गेला असल्याचं त्याला वाटायला लागलं. नकारात्मक विचार, नापसंती, कडवटपणा, मत्सर या सगळ्या गोष्टी हळूहळू त्याच्यात वाढत गेल्या. आपण कमी पडतो आहोत असं त्याला वाटायला लागलं, या सगळ्याचा परिणाम म्हणजे, ‘क’ त्याच्याबरोबरच्या इतर अधिकाऱ्यांशी शत्रुत्वानं वागायला लागला. त्यांच्याशी सहकार्य करण्याऐवजी तो त्यांच्या पूर्णपणे विरोधात जायला लागला.
१. तुमची दृष्टी उच्च ध्येयावर ठेवा.
विवाहसंबंधांत, शांती, आनंद व समाधान मिळवणं, हे उच्च ध्येय आहे. भांडणात विजय मिळवणं नाही.
२. ही गोष्ट खरोखर महत्त्वाची आहे का? असा प्रश्न स्वत:ला विचार.
३. क्षुल्लक गोष्टींच्या जाळयात सापडू नका.
१. स्वत:बद्दल हीन बोलू नका. स्वत:चं अवमूल्यन करणाच्या वाईट सवयीवर मात करा.
२. भव्य विचार करणाऱ्या लोकांची भाषा बोला. मोठे, चमकदार, आनंददर्शक शब्द वापरा.
३. आपल्या दृष्टीचा पल्ला वाढवा. आत्ता काय आहे तेवढंच बघू नका, भविष्यात काय होऊ शकेल, याकडे दृष्टी ठेवा.
४. तुमच्या कामाबद्दल सर्वसमावेशक दृष्टी मिळवा. तुमचं आताचं काम महत्वाचं आहे, असा मनापासून विचार करा.
५. क्षुल्लक गोष्टींचा विचार सोडून द्या.
परंपरागत विचार तुमच्या मनाला गोठवून टाकतात, तुमच्या विकासात खीळ घालतात आणि आपली सृजनशक्ती विकसित करण्यापासून तुम्हाला रोखतात.
१. नव्या कल्पनांचं स्वागत करण्याची सवय लावून घ्या. त्या स्वीकारण्याची तयारी ठेवा.
२. प्रयोगशील बना.
३. प्रगतीची कास धरा, अधोगतीची नाही,
‘कुठल्याही व्यवसायाला सुरुवात करताना त्याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे, हे तेवढंसं महत्त्वाचं नाही. एकदा सुरुवात केल्यावर तुम्ही काय शिकता आणि अमलात आणता, हे खूप महत्त्वाचं आहे.
क्षमता, ही मनाची एक अवस्था आहे.
तुम्ही अधिक काही करू शकता असा विश्वास जर तुमच्यात निर्माण झाला, तर तुमचं मन सृजनात्मकरित्या विचार करायला लागतं आणि तुम्हाला मार्गदर्शन करतं.
१. अधिक काम करण्याची संधी दोन्ही हातांनी स्वीकारा नवी जबाबदारी घेण्यास सांगितलं जाणं ही कौतुकाचीच गोष्ट आहे.
२. अधिक जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी अधिक काम कसं करू शकेन? यावर लक्ष केंद्रित करा. त्यानं तुम्हाला तुमच्या सध्याच्या कामाचं अधिक चांगलं आणि नेटकं नियोजन व पुनर्रचना करणं, तुमच्या दैनंदिन कामकाजाला लागणाऱ्या वेळ व श्रमात हुशारीनं काटछाट करणं, अनावश्यक गोष्टींना फाटा देणं, यासारखी सृजनात्मक उत्तरं मिळतील.