विप्रांच्या कित्येक कुळांत दरवर्षी अश्विनमाशीं विजयादशमीस त्यांच्या स्त्रियांनीं कणकीचा अथवा तांदुळाचा बळी दाराच्या ऊंबर्याबाहेर करून ठेविलेला असतो, त्याचे उरावर डावा पाय देऊन ते आपट्याच्या काडीनें त्याचें पोट फोडितात; नंतर त्यास उल्लंघून घरांत शिरतात, अशी वहिवाट सांपडते.

