जगाच्या पाठीवर कोणत्याही देशातल्या माणसांना, मानवी रक्त हाच एक धर्म आहे ह्याचं आकलन होईल, त्यांनाच ‘निधर्मी’ शब्दाचा खरा अर्थ समजला आहे. ज्यांना तो अर्थ समजला नाही, ते सगळे सत्ता टिकवण्यासाठी, मानवी रक्त इंधन म्हणून वापरतात. वयाच्या सोळाव्या वर्षी सगळ्या विश्वात शांती नांदावी म्हणून ‘पसायदान’ मागणाऱ्याज्ञानेश्वरांनाच फक्त ‘निधर्मी’ शब्द समजला होता.