धरित्रीची सेवा केली की तिच्या कृपेच्या वर्षावाखाली शेतकरीं चिंब होत असत. शेतीसाठी कर्ज काढून, ते सरकारी कर्ज कालांतराने माफ करायचं अशी प्रथा नव्हती. कारण त्या काळात भंपक लोकशाही नव्हती आणि म्हणून निवडणुका नव्हत्या. मातृभूमीवरचं अलोट प्रेम, त्या काळातले राज्यकर्ते भूखंडामागून भूखंड विकत घेऊन व्यक्त करीत नव्हते.