दोन हात आणि एक मन. माणसाने बेदम कष्ट करावेत आणि उदंड प्रेम करावं. उदंड प्रेम करणारी माणसं कशाचीच गॅरंटी मागत नाहीत. माणसाने हे प्रेम करायची शक्ती घालवली म्हणून आता नियतीसुद्धा कसलीच गॅरंटी देत नाही. संतांचं उदंड प्रेम परमेश्वरावर असतं. म्हणून संत कसलीच हमी मागत नाहीत. ते निर्भय असतात.