ह्या देशावर तीनच शब्दांचं राज्य तीन तपांवर चाललं आहे. चर्चा, मोर्चे आणि खुर्च्या. हे ते तीन शब्द. हा दत्तगुरूंचा सध्याचा अवतार. विचारवंतांचा वर्ग केवळ चर्चा करतो. विचारांशी सुतराम संबंध नसलेले फक्त मोर्चा काढतात आणि ह्या अडाणी, हिंसक वृत्तींच्या मोर्च्यांवर पुढाऱ्यांच्या खुर्च्या टिकतात.