YAYATI (Marathi)
Rate it:
59%
Flag icon
पण जिला उघडपणे आपल्या प्रियकरावर प्रेम करता आले नाही, अशा एका प्रेयसीने क्रूर दैवाच्या हातून त्याला नकळत काढून घेतलेल्या हा सुवर्णक्षण आहे, हे मात्र कुणाच्याही लक्षात येणार नाही.
60%
Flag icon
तुझे हे विस्कटलेले केस– मुद्दाम केलेल्या केशभूषेपेक्षा यात अधिक मोहकता आहे. स्वैरतेतच सौंदर्याचा विलास प्रगट व्हावा.’
64%
Flag icon
चला. नवी सृष्टी निर्माण करणारा पर्जन्य तुम्हांला सोबत करीत आहे. आकाश उजळवून टाकणारी वीज तुमच्या आईच्या हातातल्या दिव्याचं काम करीत आहे. या पर्जन्यापेक्षाही शीतल व्हायला चला, या विजेपेक्षाही तेजस्वी व्हायला चला!’
64%
Flag icon
माणूस हा देव आणि राक्षस यांचा किती विचित्र संकर आहे!
Milind BAPAT
तत्व
68%
Flag icon
जीवन आणि मरण! किती क्रूर खेळ आहे हा! केवळ हा खेळ खेळण्याकरिता मनुष्य या जगात येतो? मनुष्य कशासाठी जगतो? तो का मरतो? माधवासारखा तरुण अगदी अकाली हे जग सोडून का जातो? मनातल्या स्वप्नांच्या कळ्या उमलू लागल्या, न लागल्या, तोच माधव कुठे गेला?
68%
Flag icon
त्या वाळूच्या किल्ल्यापेक्षा माणसाचे जीवन काय निराळे आहे? माधव म्हणून आपण ज्याचा गौरव करतो, परमेश्वराची इहलोकातली प्रतिमा म्हणून आपण ज्याच्या कर्तृत्वाची पूजा करतो, तो कोण आहे? विश्वाच्या विशाल वृक्षावरले एक चिमणे पान!
Milind BAPAT
तत्व
70%
Flag icon
जिथे माणूस पाषाण होतो, तिथे पाषाणापासून माणुसकीची अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे?
70%
Flag icon
संयोग आणि वियोग यांच्या अद्भुत रसायनालाच जीवन म्हणतात का?
71%
Flag icon
पूरूचे डोळे हे माझे सूर्यचंद्र होते. त्याची नाजूक मिठी हे माझे संरक्षण करणारे सुदर्शनचक्र होते. त्याचे पापे– कुबेराच्या भांडारालाही लाजविणारे माझे धन होते ते! झोपेत तो हसला, म्हणजे मध्यरात्री अरुणोदय झाल्याचा मला आनंद होई. त्याच्यासाठीच
72%
Flag icon
आता त्या चांदण्याने मलाच वेडे केले. वृक्षांच्या खाली त्याने किती सुंदर रांगोळ्या घातल्या होत्या.
Milind BAPAT
Upma
72%
Flag icon
एखाद्या विहिरीतले शेवाळ बाजूला केल्यावर आतले स्वच्छ पाणी दृष्टीला पडावे, तसा भास झाला मला त्याच्याकडे पाहून!
73%
Flag icon
वातचक्रामध्ये एखादे पान झाडावरून तुटून गिरगिरत, भिरभिरत आकाशात कुठेतरी दूरदूर जाते! त्या पानाला मात्र वाटत असते, की आपण उंच-उंच जात आहो, स्वर्ग आपल्यापासून फक्त दोन बोटे दूर आहे! तसे यतीचे आयुष्य झाले होते. हे वातचक्र, हे पान,
73%
Flag icon
आत्म्याच्या उन्नतीसाठी शरीराचे हाल करणे किंवा शरीराच्या सुखासाठी आत्म्याला बेशुद्ध करून ठेवणे हे दोन्ही मार्ग चुकीचे आहेत.
Milind BAPAT
Tatv
73%
Flag icon
सर्वसामान्य संसारी माणसांनी आपली बायकामुले, स्नेहीसोबती व संबंधित माणसे यांच्या उन्नतीची चिंता करावी. या सर्वांनी आपले सुख जगातल्या दुसऱ्या कुणाच्याही दुःखाला कारणीभूत होत नाही ना, हे डोळ्यांत तेल घालून पाहिले पाहिजे. व्यक्तिधर्म, संसारधर्म, राजधर्म, यतिधर्म सर्व सारख्याच योग्यतेचे धर्म आहेत. यांपैकी कुठल्याही धर्माला जीवनाचा तिरस्कार करण्याचा किंवा त्याला ज्या मूलभूत मर्यादा आहेत, त्या ओलांडण्याचा अधिकार नाही.
Milind BAPAT
Tatv
73%
Flag icon
निरपेक्ष प्रेम हा सर्व धर्मांचा राजा आहे, हे यतीपासून पतीपर्यंत प्रत्येकाने ध्यानात ठेवले पाहिजे.
Milind BAPAT
Tatv
73%
Flag icon
कच आणि यति हे पुरुष होते. घर हे स्त्रीचे विश्व असते; पण विश्व हे कचासारख्या पुरुषांचे घर असते.
74%
Flag icon
जे जीवन वाट्याला आलं आहे, ते आनंदानं जगणं, त्या जीवनातला रस किंवा सुगंध शोधणं, तो सर्वांना आनंदानं देणं हा सुखी होण्याचा सर्वांत सोपा मार्ग आहे.’
74%
Flag icon
निसर्ग आणि मनुष्य यांचे अनादी आणि अनंत असे निकटचे नाते आहे. हे दोघे जुळे भाऊच आहेत. म्हणूनच मनुष्य निसर्गाच्या सहवासात असला, म्हणजे जीवन आपल्या सत्यस्वरूपात त्याच्यापुढे प्रगट होते.
Milind BAPAT
Outstanding
74%
Flag icon
नाही, माणसाला शरीर सदैव दूर फेकून देता येत नाही!
Milind BAPAT
Outstanding
75%
Flag icon
पण भीती जशी त्याच्या मनाच्या एका दारातून निघून गेली, तशी प्रीती दुसऱ्या दाराने तिथे राहायला आली.
76%
Flag icon
पण चातकाने मेघाकडे जलबिंदूंच्या आशेने पाहावे आणि त्या मेघातून त्याच्यावर वीज कोसळावी, तशी माझी स्थिती झाली आहे.
Milind BAPAT
A-ha
78%
Flag icon
प्रेम ही काय बाजारातली वस्तू आहे? जेवढे मोल मिळेल, तेवढ्याच किमतीची वस्तू द्यायची, हा बाजारातला न्याय झाला!
79%
Flag icon
अजूनही एखाद्या उदास क्षणी ती किंचाळू लागते : ‘तू आपल्या धर्माला जागली नाहीस, तू आपलं कर्तव्य जाणलं नाहीस. प्रेम काय बाह्य गोष्टींवर अवलंबून असतं? प्रीती एका हृदयातून उगम पावणारी आणि दुसऱ्या हृदयाला जाऊन मिळणारी महानदी आहे. वाटेत कितीही उंच डोंगर येवोत, त्यांना वळसा घालून ती पुढे वाहत जाते. ज्या दिवशी कुठलंही माणूस आपलं होतं, त्याच दिवशी त्याच्या गुणांचा नि अवगुणांचा मनुष्याच्या मनातला हिशेब संपतो. मागे राहते, ती केवळ निरपेक्ष प्रीती! अडखळत, ठेचाळत, धडपडत, पुनःपुन्हा पडत, पण पडूनही भक्तीच्या शिखराकडं जाण्याचा प्रयत्न करणारी प्रीती! परमेश्वराची पूजा करताना त्यानं आपल्याला काय दिलं आहे आणि का ...more
Milind BAPAT
Tatv
80%
Flag icon
ही पडली ओढाळ गुरांची जात! मुसक्या बांधल्या, तरी जाता-जाता जवळच्या शेतात तोंड घातल्याशिवाय कधी राहायची नाही.
81%
Flag icon
नाजूक पापण्यांची वल्ही घेऊन प्रीतीचा शोध करायला निघालेल्या या चिमण्या नौका! या नौकांत बसून मी अगणित वेळा स्वर्गाचा
82%
Flag icon
तो तांबडा, लालभडक, संध्यारंग! मृगयेतल्या आनंदाचा हा मूर्तिमंत आविष्कार आहे. काळ्या भिल्लिणीच्या हातांतून पहाटे निसटलेले दिवसाचे सावज आता तिच्या आटोक्यात आले आहे. तिचा बाण त्याच्या उरात खोल रुतला
82%
Flag icon
जगात तीनच गोष्टी खऱ्या आहेत- मद्य, मृगया, मीनाक्षी. या तिन्हींच्या सहवासात मनुष्य आपली सर्व दुःखे विसतो. मद्यामुळे माणसाच्या मनाला पंख फुटतात. त्या पंखांच्या फडफडाटाने त्याच्या पायांतल्या शृंखला तुटून पडतात. नीतीच्या, कर्तव्याच्या, पापपुण्याच्या साऱ्या साऱ्या कल्पना मद्याच्या मोहक दाहकतेत वितळून जातात! या जगात ज्याला आपली शिकार होऊ द्यायची नसेल, त्याने सतत इतरांची पारध करीत राहिले पाहिजे. जीवनातले हे अंतिम सत्य शिकवणारा मृगयेसारखा दुसरा गुरू नाही. हे सत्य कठोर वाटते, क्रूर भासते; पण जीवनाच्या महाकाव्यातला हा सर्वांत महत्त्वाचा श्लोक आहे. पवित्र, सुंदर, निष्पाप हे दुबळ्या सज्जनांनी निर्माण ...more
83%
Flag icon
‘महाराज, जीवनाच्या जमाखर्चात उधारीला जागा नाही. जो आज सुगंधी फुलांचा वास घेत नाही, त्याला तो उद्या मिळेलच, असे नाही. या जगात उद्याची सोनेरी सकाळ उगवेल! उद्याची सुगंधी फुले फुलतील! पण त्या उद्याच्या जगात हा वास घेणाराच असणार नाही!’
Milind BAPAT
Bhogwadi tatv
83%
Flag icon
त्या सर्वांचे सार एकच होते. धर्म, नीती, पुण्य, आत्मा, इत्यादी पवित्र शब्दांची मनुष्य हरघडी पूजा करीत असतो. पण ती जगाच्या डोळ्यांत धूळ फेकण्याकरिता. मनातल्या मनात तो एकाच गोष्टीसाठी झुरत राहतो. ती म्हणजे सुख- शरीराच्या द्वाराने मिळणारे प्रत्येक प्रकारचे सुख!
83%
Flag icon
मिळणारा प्रत्येक क्षण हा माणसाने सुवर्णक्षण मानला पाहिजे. त्यातला रस, सुगंध, आनंद अगदी कठोरपणाने पिळून घेऊन, माणसाने आपली सुखाची तृष्णा शांत केली पाहिजे, हे तत्त्वज्ञान मंदारने मला शिकवले.
85%
Flag icon
या जगात प्रत्येकाचे लहानसहान सुखसुद्धा त्याच्या स्वभावाने, परिस्थितीने आणि जीवनाच्या अपूर्ण स्वरूपाने मर्यादित केलेले असते, याची जाणीव मला झाली नाही!
Milind BAPAT
Mahatwache
90%
Flag icon
पाप किती भित्रे असते!
90%
Flag icon
पाडसाचा जीव घेणाऱ्या पारध्याला हरिणीची समजूत घालता येईल का? त्याला तिचे समाधान करता येईल का?
Milind BAPAT
वा
91%
Flag icon
खरेच, मनुष्य किती चांगला आहे! तो दुसऱ्यावर किती विश्वास ठेवतो! विश्वास, श्रद्धा, निष्ठा, प्रीती, भक्ती, सेवा यांच्या बळावर तो जगतो.
92%
Flag icon
बुद्धी, भावना आणि शरीर यांचा त्रिवेणी संगम म्हणजे मानवी जीवन. संगमाचे पावित्र्य एकेका नदीला कसे येईल?
92%
Flag icon
प्रेम कसे करावे, हे तुला शिकायचे आहे ना? तर मग नदीला गुरू कर. वृक्षाला गुरू कर. मातेला गुरू कर.
92%
Flag icon
उपभोग घेऊन वासना कधीही तृप्त होत नाही. आहुतींनी अग्नी जसा अधिकच भडकतो, तशी उपभोगाने वासनेची भूक अधिक वाढते!
93%
Flag icon
‘सुखात, दुःखात सदैव एक गोष्ट लक्षात ठेव. काम आणि अर्थ हे महान पुरुषार्थ आहेत. मोठे प्रेरक पुरुषार्थ आहेत. जीवनाला पोषक असे पुरुषार्थ आहेत. पण हे स्वैर धावणारे पुरुषार्थ आहेत. हे पुरुषार्थ केव्हा अंध होतील, याचा नेम नसतो! त्यांचे लगाम अष्टौप्रहर धर्माच्या हातांत
Milind BAPAT
मोस्ट important msg
93%
Flag icon
काल-परवाचे ज्वलंत प्रश्न हे बेरीज-वजाबाकीच्या उदाहरणांइतके सोपे वाटावेत, अशा नव्या सामाजिक, राष्ट्रीय आणि जागतिक समस्या दत्त म्हणून पुढे उभ्या राहिल्या आहेत! अशा वेळी आजच्या कादंबरीकाराने कथासूत्राकरिता पुराणांकडे धाव घेणे हा वैचारिक पळपुटेपणा नाही का?
94%
Flag icon
पण खरोखर आपल्या पुराणकथा या साहित्यिकाच्या दृष्टीने सोन्याच्या खाणी आहेत.
94%
Flag icon
सत् व असत् यांमधला तो चिरंतन कलह आहे, हे मला त्या वेळी बिलकुल कळले नाही. नैतिक शक्ती व भौतिक शक्ती यांचे मानवी जीवनात अखंड सुरू असलेले भांडण
94%
Flag icon
मी महाकवी होण्याचा तो योग– खरे सांगायचे म्हणजे, काव्यसृष्टीवर येऊ घातलेली एक मोठी आपत्ती– अशा रीतीने टळली; पण उत्कृष्ट
95%
Flag icon
भारतीय संस्कृतीच्या ऐसपैस गप्पा मारीत पांढऱ्या टोप्या घालून समाजकंटकांनी केलेला काळा बाजार, तिरंगी झेंड्याकडे अभिमानाने
96%
Flag icon
पतीला पत्नीकडून जे प्रेम हवे असते, त्यात जी आर्तता, आर्द्रता, उत्कटता आणि उदात्तता लागते, ती अशा देवयानीकडून ययातीला मिळण्याचा मुळीच संभव नव्हता! अशा
97%
Flag icon
असल्यामुळे आणि या प्रगतीच्या प्रयत्नात धर्म, नीती, कला, शास्त्र, संस्कृती, इत्यादी नव्या सामर्थ्यांचा साक्षात्कार त्याला होत असल्यामुळे, वृद्धिंगत होऊ शकणारी आत्मिक शक्ती– ही त्याच्या जीवनातील एक अपूर्व शक्ती होऊन बसली आहे. तो सर्व चरावर सृष्टीपेक्षा भिन्न आहे, तो
97%
Flag icon
वैयक्तिक व सामाजिक जीवनात वासनांचे आणि विकारांचे नियंत्रण किंवा उदात्तीकरण करणारा मानव जोपर्यंत निर्माण होणार नाही, तोपर्यंत मानवतेला सुख आणि शांती यांची प्राप्ती होण्याचा संभव नाही.
97%
Flag icon
यंत्रयुगाने जीवनाला आलेल्या वेगाने आणि भौतिक सौंदर्य व नैतिक कुरूपपणा यांच्या होऊ लागलेल्या विचित्र मिश्रणाने सामान्य मानवाची दुःखे वाढत जातील.
Milind BAPAT
True
97%
Flag icon
कच हा आत्मविकासाची धडपड करणाऱ्या मानवाचा प्रतिनिधी आहे. ययाति हा अष्टौप्रहर सुख भोगण्याच्या निराधार नादात आत्मलोपाला– अंतरीचा दिवा मालवायला प्रवृत्त झालेल्या मानवाचा प्रतिनिधी आहे.
97%
Flag icon
केव्हाही झाले, तरी जगात कच थोडे, ययाति फार!
97%
Flag icon
अशा रीतीने चाळवल्या जाणाऱ्या असंख्य वासनांमुळे आधुनिक मानवाचे मन हा एक अतृप्त, हिंस्र प्राण्यांनी भरलेला अजबखाना बनत आहे.