Goodreads Librarians Group discussion

This topic is about
Political letters of Shāh Walīullāh Dehlavī
[Closed] Added Books/Editions
>
[Done]Please add new edition of this book
date
newest »

* Author: Rohit Sahasrabudhe
* ISBN: 8194755646, 978-8194755647
* Publisher: marathaempire.in
* Publication: 23 October 2023
* Page count: 144
* Format: Paperback
* Description: या पुस्तकात शाह वलिउल्लाह देहलवी या सुफी प्रचारकाच्या एकूण ४२ पत्रांचा फार्सी पाठ व मराठी अनुवाद आहे. यातील सर्वात मोठे पत्र अहमद शाह अब्दालीला लिहिले आहे. 'इस्लामी सलतनत' म्हणजे नक्की काय प्रकार असतो, तिचे उद्दिष्ट काय असते व तिच्या द्वारे समाजात कुठल्या गोष्टी व बदल होणे अपेक्षित असते, याचा जणू धडाच या पत्राद्वारे वलिउल्लाहने दिला आहे. नजीबउद्दौला, आसफ जाह, इमाद-उल-मुल्क सारख्या उच्चपदस्थ उमरावांनाही काही पत्र लिहिली आहेत. स्वतः बादशाह शाह वलिउल्लाहला भेटायला आल्याचा व त्यांच्यात झालेल्या चर्चेचा वृतांत दोन पत्रांमध्ये दिला आहे. इस्लामी सलतनतीच्या जोरावर औरंगजेबाने चालवलेला जिहाद, त्याच्या मृत्यूनंतर चालू ठेवणे अवघड होते. मुघल सलतनतीची झालेली दुरावस्था लक्षात घेऊन शाह वलिउल्लाह देहलवी याने छद्मी जिहादाचे बीज भारतीय उपखंडात पेरले. जिथे इस्लामी सत्ता प्रबळ नसेल आणि मुसलमानेतर बहुसंख्य असतील तिथे सौम्यता बाळगत, वेळ साधून जिहाद करावा असे तो सुचवतो. धर्मांतराचे कडू औषध मधात घोळून दिले पाहिजे अशी रूपकात्मक सूचना ही तो त्याच्या पत्रांतून करतो. दख्खन मधून मराठे, दिल्ली व आग्रा परिसरात जाट व पंजाबात शिख या तीन काफिरांचे वाढते प्राबल्य त्याला फार अस्वस्थ करत होते. याच कारणास्तव त्याने अब्दालीला भारतावर आक्रमण करून इथली दुर्बल इस्लामी सत्ता हाती घेण्याची याचना केली. भारतातील काफिरांचे उच्चाटन केल्यावर अब्दाली उर्वरित आयुष्य इथेच घालवेल अशी आशा ही तो एका पत्रात व्यक्त करतो. इतिहासकार आयेशा जलाल म्हणतात, ‘जिहादचा सर्वात पद्धतशीर सिद्धांत मांडण्यासाठी शाह वलिउल्लाह दक्षिण आशियात ओळखले जातात’. यावरून त्यांच्या विचारांच्या दिशेची व प्रभावाची ही कल्पना करता येते.
* Language: Marathi
*Link: https://www.amazon.in/Waliullah-Dehla...