तुम्हाला फक्त ब्राम्हणांचीच गरिबी तेवढी असह्य वाटते. बाकीच्या जातींची गरिबी तर तुम्ही कथाकादंबऱ्यापासून गृहीतच धरलेली आहे. किती गरीब कोळी, माळी, शिंपी, सोनार, महार, कुणबी हुशार असून मागे रहातात, याची तुम्हाला दखलही घेववत नाही. जणू काही प्रत्येक गोष्ट मिळणं हा फक्त ब्राम्हणांचाच अधिकार आहे. सगळ्याच गरीब बुद्धिमान पोरांबद्दल बोलत जा. आणि ह्या संघवाल्यांनी गोवधबंदीचं कसलं आंदोलन सुरू केलं आहे? तुम्हा ब्राम्हण मंडळींना नुसत्या गायी पाळा म्हणायला काय जातं? कोणते ब्राम्हण गायी पाळतात? दाखवा बरं एक तरी? म्हणजे गायी म्हशी पाळणारे कुणबी लोक बिचारे शेणामुताच्या वासात गोठ्यापाशी रहाणार! आणि तुम्ही
...more