भोळे म्हणाला, असं तपासत तपासत गेलं तर मुळात हिंदुस्थानात दहावीस कुळंसुद्धा प्युअर ब्राम्हणांची सापडायची नाहीत. सगळ्या धूर्त लोकांनी अर्ज करूकरू ब्राम्हण होऊन घेतलं असेल ब्राम्हनिझम्च्या चलतीत! गंगातीरकर म्हणाला, आता काही दिवसांनी महारांचं राज्य आलं तर ह्या सगळ्या बदमाश जाती स्वतःला महार म्हणवून घेतील!