इथे पुराणिकमधे च्यायला इतकी कामं पाठीमागे लावून देतात, पुन्हा इतक्या चर्चा करतात माठूराम वगैरे लोक की बोअर व्हाल तुम्ही! एकदिवसाआड स्टाफ मिटिंगा घेऊन जगात शांती कशी प्रस्थापित होईल याच्यावर रात्ररात्रभर प्राध्यापकांना बोअर करतात साले. पण इलाज नाही. निव्वळ ब्राम्हणी वाद. निष्कर्ष शून्य. तुका म्हणे वादे-वाया गेली ब्रम्हवृंदे!