“एखाद्या वेळी दुर्दैव जाता-जाता आपल्याला धक्का देऊन जातं. त्या धक्क्यानं मनाचा तोल जातो. अशा वेळी बसतो हे लाकडी वजीर नाचवीत! एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला दैव. या दैवाचे डाव मीच टाकतो. काही वेळा ते जिंकतं; काही वेळा मी जिंकतो. मग हार-जीत सारखी वाटू लागते. मन हळूहळू ताळ्यावर येतं.

