“पत्र वाचून त्या पोराचा राग येण्याऐवजी माझाच राग आला मला! मग बसलो बुद्धिबळ खेळायला. हा खेळ म्हणजे साऱ्या तत्त्वज्ञानाचा मुकुटमणी आहे. आपण एकट्यानंच खेळायला बसलो, म्हणजे या नाटकात नायक आपण होतो, प्रतिनायकही आपणच असतो. एकाच वेळी आपण जिंकतो आणि हरतो. आपला जय हा आपलाच पराजय होतो. हा अनुभव घेतल्याशिवाय माणसाला जीवनाचा अर्थ कळायचा नाही!”

