“निसर्गानं माणूस मातीचा घडविला आहे. पण मातीच्या या भंगुर पुतळ्याला त्यानं प्रकाशाचे अमर पंख दिले आहेत. सावित्रीनं या पंखांचा उपयोग केला. त्यामुळं ती आकाशातली नक्षत्रं वेचू शकली. हॅम्लेटची आई या पंखांचं अस्तित्वच विसरली. माणसाची ही जाणीव नाहीशी झाली, की हळूहळू ते पंख गळून पडतात. मग उरतो, तो नुसता मातीचा पुतळा. कुठल्याही वासनेच्या लोंढ्यात सहज वाहून जाणारा. पाहता-पाहता त्या पुतळ्याचा चिखल होतो! मग मनुष्य त्याच चिखलात डुकराप्रमाणं लोळत राहतो.

