‘ती ऐकतच नाही.’ राम फटकन म्हणाला. ‘मी जेव्हा तिला राजवाड्यात राहायला सांगितलं, तेव्हा तिने माझ्याबरोबर अरण्यात येण्याचा आग्रह धरला. जेव्हा तू तिला अरण्यात कुटीच्या आत राहायला बजावलेस, तेव्हा ती हट्टाने बाहेर आली. रावणाला मारल्यावर जेव्हा मी उद्धटपणे तिला विवाहबंधनातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला, तिव्हा तिने अग्निपरीक्षा देऊन, पावित्र्याचे प्रदर्शन करत माझ्याबरोबर परत नगरीत येण्याचा आग्रह धरला. जर मी तिला सांगितलं की ती अफवांचं कारण आहे, आणि म्हणून ती माझ्याबरोबर राहू शकत नाही, तर ती मला इतके गुंतागुंतीचे प्रश्न विचारेल, की मी त्यांची उत्तरं देऊ शकणार नाही. हे असंच बरोबर आहे. तिला समजेल. तिला
...more