समाजात, एखाद्या माणसाकडे काय आहे, यावरून त्याची किंमत ठरते. पण राम स्वत:ची किंमत त्यावरून ठरवत नाही. तो अयोध्येकडे त्याची मालमत्ता किंवा हक्क म्हणून बघत नाही. त्यामुळे तो ती सहजपणे सोडून देतो. यातून शहाणपण दिसून येते. स्वतःचे मूल्य कसे करायचे, हे ठरवण्याची क्षमता तपस्या माणसाला देते. यावरूनच तो समाजात कोणत्या प्रकारे यज्ञ करणार हे ठरते. पण या महाकाव्याच्या सुरुवातीला, ज्या तऱ्हेने राम स्वतःला अयोध्येपासून सुटे करतो, ते महान वाटते, पण महाकाव्याच्या अखेरीस, तो त्याच पद्धतीने स्वतःला पत्नीपासूनही सुटे करतो, ते भयंकर वाटते. अलिप्तपणाची काळी बाजू हे महाकाव्य समोर आणते. वाटते तितकी अलिप्तता नेहमीच
...more