‘नाही, मंथरे, तुझा दोष नाही. तू कैकेयीच्या मनातील सुप्त भीती चेतवलीस आणि तिने माझ्या वडिलांचा बेजबाबदारपणा उघडकीस आणला. भविष्यात मागून घेता येतील असे वर न देण्याची निवड त्यांना करता आली असती. ते न मागण्याची निवड तिला करता आली असती. प्रत्येकजण त्याच्या कृतीसठी उत्तरदायी आहे. मी तुला दोष देत नाही, किंवा तुला जबाबदारही धरत नाही. शांतपणे घरी परत जा.’