आत्ता मी मेलो, तर अयोध्येचं कसं होईल?’ तो म्हणाला. ‘काहीही नाही.’ कौसल्या खिन्नपणे म्हणाली. ‘सूर्य उगवेल. पक्षी गातील आणि नगरी आपल्या नित्याच्या व्यवहाराला लागेल. जगाला आपली गरज नाही, पतिदेव, आपल्याला जगाची गरज आहे. चला, आत जाऊया आणि भरताच्या राज्याभिषेकाची तयारी करूया. सुदैव आणि दुर्दैव येतं आणि जातं, पण जीवन चालूच असतं.’