‘भीती ही नित्य आहे आणि श्रद्धा ही निवड आहे. भीती कर्मातून निर्माण होते, श्रद्धेतून धर्म निर्माण होतो. भीती ही कैकेयी आणि रावण, कुचाळक्यांनी भरलेले रस्ते, कठोर नियम आणि नाजुक कीर्ती असलेली कुटुंबे निर्माण करते. ते कायमच राहाणार आहेत. श्रद्धा ही सीता आणि राम निर्माण करते. जगाने आपला त्याग केला तरी आपण जगाचा त्याग करणार नाही एवढं आपलं मन विस्तारण्याएवढी जर आपली श्रद्धा असेल, तरच ते अस्तित्वात येतात.’