रामाने ऋषिंना लवून नमस्कार केला आणि म्हणाला, ‘मला जे नाकारलं गेलेलं दिसत आहे, त्या राजाच्या जीवनाविषयी तुम्हाला कळकळ आहे. जे माझं असायला हवं होतं, ते जीवन माझ्यापासून हिरावून घेतला गेलेला मी तुम्हाला एक बळी वाटतो. माझ्या वडिलांच्या इच्छेपुढे मान तुकवणारा आणि तुमच्या दृष्टीने जगाकडे न पाहू शकणारा एक मूर्ख वाटतो, पण मला असं बाटतं, की गोष्टी मला जशा दिसतात, तशा इतरांना का बरं दिसत नसतील. मी स्वत:ला बळी समजत नाही. मी राजाच्या जीवनासाठी तळमळत नाही. कुठल्याही राजवैभवाशिवाय आणि अधिकाराशिवाय वनात राहावं लागणं ही मी शोकांतिका समजत नाही. मी याला एक संधी समजतो, आणि माझ्यासारखा विचार इतर लोक करू शकत
...more