‘फुलं स्वत:ला सुगंधित करतात आणि मध देऊ करतात. का? मधमाशांना पोसण्यासाठी, की परागीभवन होण्यासाठी? की दोन्ही? निसर्गात, मिळवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं. दान काहीच नसतं. शोषण नसतं, स्वार्थ नसतो, की नि:स्वार्थपणाही नसतो. इतरांना वाढायला मदत करूनच कुणाचीही वाढ होते. पूर्णत्वाला पोचलेला समाज म्हणजे हाच नव्हे का?’