मृत्यूच्या भीतीने वनस्पती पोषणाच्या मागे लागतात आणि सूर्यप्रकाश आणि पाण्याच्या दिशेने वाढतात. मृत्यूच्या भीतीने पशू अन्नाच्या आणि भक्ष्याच्या दिशेने धावतात. त्याच वेळी जीवनाच्या आसक्तीने पशू भक्षकांपासून पळून लपून बसतात. पण मानवी भीती ही एकमेव आहे: कल्पनेने त्यात भरच घातली जाते, ती मूल्यं आणि अर्थ शोधते. ‘मी महत्वाचा आहे का? मला महत्त्व कशामुळे प्राप्त होईल?’