होय, हा प्रसंग दुर्दैवी खराच, पण तो आपल्या जीवनातील एक प्रसंग आहे, त्याला हवं तर आपण शोकांतिका म्हणू शकतो. दोषारोपाने कुणाचेच भलं होत नाही, आपापल्या जबाबदाऱ्या घेऊ या. कारण जीवनात काहीही अचानक घडत नाही; हे आपल्या पूर्वकर्माचं फळ आहे. हा क्षण जसा असायला हवा तसाच आहे. मी भूतकाळाचं कर्ज फेडत आहे, तसेच तुम्हीही. आपण आपल्या जीवनातील परिस्थिती बदलू शकत नाही, पण आपण आपले पर्याय निवडू शकतो.