निष्ठा ही वैवाहिक जीवनात इतकी महत्त्वाची का, याचं कुतूहल मांडवीला होतं. तिने ऐकलं होतं, की राक्षस स्त्रिया स्वत:ला केवळ पतीपुरतं मर्यादित ठेवत नाहीत, आणि राक्षस पुरुषही स्वत:ला पत्नीपुरतं मर्यादित ठेवत नाहीत. निसर्गात सर्व प्रकारचे संबंध आढळ्तात: हंसपक्षी एकमेकांशी एकनिष्ठ राहातात. वानरांमधले नर माद्यांचा ताफा बाळगतात आणि असूयेने त्यांचं रक्षणही करतात, राणी माशीचे अनेक चाहते असतात. मग ऋषिंनाच एकनिष्ठता इतकी महत्त्वाची का वाटते? ‘आपल्या सहचाऱ्याने आपल्याला जे देऊ केलं आहे, त्याबद्दल आपण किती समाधानी आहोत, त्याचं हे एक द्योतक आहे. हे असमाधान मग दुसरीकडे कुठेतरी समाधान शोधतं.’ विश्वामित्र
...more