–आठवणीवरून आठवणी निघतात. एकाच रागदारीत रचना केलेली गाणी जशी लागोपाठ आठवतात, तसं होतं. एकाच रागदारीचे स्वर दोन गाण्यांत असल्याने, एका गाण्यावरून दुसऱ्या गाण्यावर कधी व कसे गेलो हे जसं कळत नाही, त्याप्रमाणे, उत्कटतेने बांधलेले दोन वेडे एकत्र येतात, तेव्हा एका वेड्याच्या हकिगतीतून, दुसऱ्या वेडयाच्या गोष्टी कधी सुरू होतात, हे कळत नाही. एकातून दुसरी, त्यावरून तिसरी हा प्रवास कुठे थांबेल हे सांगता येत नाही,