आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही. आयुष्य म्हणजे आखून दिलेली पायवाट नव्हे किंवा रेल्वेचे रूळ नव्हेत. ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहतं. वाट आणि उतार गवसेल तसं. त्याच्यासाठी पूर्वनियोजित आखून दिलेला मार्ग नाही. म्हणून आयुष्यालाही दिशा नाही. आपण ठरवलेल्या दिशेनेच जात राहू, मुक्कामाचं ठिकाण जे निश्चित करू, तिथंच पोचू, ही शाश्वती नाही.