‘नाही, पितामह, ती निष्ठा आता माझ्याजवळ नाही. माझी जन्मकथा मला कळली नसती, तर फार बरं झालं असतं, कृष्णानं प्रथम मला जन्मरहस्य सांगितलं, ते शिष्टाई असफल झाल्यानंतर. त्यानंतर जिचा आयुष्यभर शोध घेत होतो, त्या मातेचं दर्शन युद्धाच्या उंबरठ्यावर घडलं. माझी खरी कवचकुंडलं हरवली, ती त्या वेळी. दोघांनीही माझ्यापासून पांडव सुरक्षित करून घेतले आहेत. आता खोटा उत्साह देण्यासाठी वल्गनेखेरीज माझ्याजवळ काहीही राहिलं नाही. गुरुदेवांचा शाप खरा होवो. ब्रह्मास्त्र आठवलं, तरी ते माझ्या भावांवर कसं सोडता येईल? मी थोरला आहे ना!’ आपले अश्रु पुशीत कर्ण म्हणाला, ‘माझ्या मैत्रीला केव्हाच तडा गेला. आता दुर्योधनाच्या
...more