‘आई, चिंता करू नकोस, तुझ मन व्यथित होईल, असं मी काहीही करणार नाही. ज्या माझ्या वचनाचा आज तू स्वाकार करात आहस, त्यात तुला आनंद नाही, हे मी जाणता. माझ्यासाठा फक्त एकच कर. जव्हा तुझ्या या मुलाचा प्रवास संपेल, तो सागराला मिळाल्याचं तुला समजेल, तेव्हा मात्र त्याच्यासाठी दोन अश्रु ढालव समाधानचे...सुटकेचे. कारण... कर्णाला बोलणे जड जात होते. कष्टाने तो म्हणाला, ‘कारण... त्या वेळी पृथ्वीतलावर या दुर्दैवी कर्णासाठी फार थोडे अश्रु ढळतील. वृषाली. दुर्योधन, यांच्या डोळ्यांत माझ्या मृत्यूनं अश्रु तरळतील खरे, पण त्यांनाही स्वार्थाचा स्पर्श असेल. पण तुझे निखळ अश्रुः स्वर्गाची वाटचाल करण्यास मला बळ देतील.’