कर्णाने एक अत्यंत तीक्ष्ण असा बाण निवडला. तो साक्षात अग्री भासणारा बाण आपल्या धनुष्याला जाडून कणाने आकर्ण प्रत्यंचा खचला, अर्जुनाच्या छातीचे लक्ष्य धरून कर्णाने बाण सोडला. वारुळात नाग शिरावा, तसा तो बाण अर्जुनाच्या छातीत शिरला. त्या आघातान अर्जुन आतावाद्ध हाऊन उभ्या जागा कापू लागला. त्याच्या हातचे गांडीव धनुष्यही गळून पडले आणि तो रथात ढासळला. कर्णपराक्रमाने चकित झालल्या कृष्णाने कर्णावर एकदा क्रुद्ध दृष्टी टाकला आणि मूर्चिछत पडलेल्या अर्जुनाला सावध करण्यासाठी तो वळला. कर्णाने आपल्या भात्यातला दुसरा बाण खेचला. प्रत्यंचा खेचीत असता त्याचे लक्ष अर्जुनावर स्थिरावले, अर्जुनाच्या कमरचा शेला काढून
...more