‘कृष्णा! हेच मलासुद्धा म्हणता येईल. हेच सत्य असेल, तर तू पांडवांच्या बाजूनं का उभा राहिलास?’ ‘त्याचं उत्तर मी शोधतोय्, विदुरा... निष्ठा स्नेहानं बांधली जाते. नुसत्या माझ्या पित्याची बहीण. पांडव माझ्या आत्याचे पुत्र. या नात्यानंच आम्ही जवळ आलो, असं नाही. या पांडवांच्या गुणांनी मी त्यांच्याकडं आकर्षित झालो. द्रौपदीशी पांडवांचा विवाह झाला, तेव्हा पांडवांच्या बाजूनं तिथं कोणी नव्हतं. मी ती उणीव भरून काढली. पांडवांना मी अगणित संपत्तीचा अहेर केला. त्यांच्या सहवासात अभेद्य स्नेह निर्माण झाला. त्यांना कुणाचा आधार नव्हता. त्यासाठी मी पुढ झालो. अरण्यातसुद्धा त्यांचं राज्य वसवलं. खांडवप्रस्थाचं रूपांतर
...more