‘काय केलं? आज सारी नगरी तेच बोलत आहे. धार्ष्ट्य असलं, तर ऐक जा- तुझ्या सल्ल्यांन तो द्यूत घडला. तू तो घडवून आणलास, असं सारे बोलतात.’ ‘खोटं! तात, मी युद्धाचा सल्ला दिला होता. या द्यूतात माझा कसलाही हात नव्हता.’ ‘पण लोकांना ते पटत नाही.’ ‘त्याला मी काय करणार?’ ‘अन् त्यांचं खोटंही नाही. तू आग्रह धरला असतास, तर युवराज द्यूत खेळले नसते.’ ‘युवराज एवढे आज्ञाधारक केव्हापासून बनले?’ कर्ण हसत म्हणाला. ‘राधेया, मी जेवढा तुला ओळखतो, तेवढाच युवराजांनाही. तुझा विरोध सहन करण्याची ताकद युवराजांना नाही, हे मला पूर्णपणे माहीत आहे... अन् हे सारं तू उघड्या डोळ्यांनी पाहिलंस, घडू दिलंस. हेच तुझं पातक आहे. कर्णा,
...more