‘कर्णा, ते दुःख मीही जाणतो. त्याची व्यथा मलाही माहीत आहे. कुणाला नदीप्रवाहावर सोडून दिल जातं, कुणाला नदी ओलांडून पैलतीर गाठावा लागतो. कुणी गवळ्याचं पोर म्हणून नंदाघरी वाढतं, तर कुणाला सूतकुलात आश्रय लाभतो. मातृवियोग दोघांच्याही भाळी सारखाच लिहिलेला. सुटल्या किनाऱ्याची ओढ धरून जीवनाचा प्रवास कधी होत नसतो, अंगराज!’