‘भीम म्हणाले’, दूत सांगू लागला, “त्या दुर्योधनाला जाऊन सांग. ज्या वर्षी प्रतिज्ञेची तेरा वर्षं पूर्ण होतील, तेव्हा नराधिपती धर्मराज रणयज्ञामध्ये शस्त्रास्त्रांच्या प्रदीप्त अग्नीमध्ये दुर्योधनाची आहुती देण्यास सज्ज होईल, तेव्हाच कुंतीपुत्र तिथं येतील अन् जेव्हा हा धर्मात्मा युधिष्ठिर, सर्व धृतराष्ट्रपुत्र स्वतःच क्रोधानं उद्दीपित झाले असता, त्यांना अधिक प्रज्वलित करणारा क्रोधरूपी हवीचा प्रक्षेप करील, तेव्हा मीही तिथं येईन.” सारी सभा तो निरोप ऐकून सून्न झाली.