‘दुर्योधना! अरे, तू किती जणांना दुखवणार आहेस? तुझ्या हट्टी स्वभावामुळं तू युद्ध उभारलंस, तर पांडवप्रेमानं सदैव त्यांचं हित चिंतणारे हे भीष्म, द्रोण, कृप तुझ्या बाजूनं लढतील का? फार झालं, तर तुझ्या अत्रवर वाढल्यामुळं ते कौरवांच्या बाजूनं आपलं जीवित अर्पण करतील; पण त्या युधिष्ठिराकडं क्रोधानं पाहण्यासही धजणार नाहीत.’