‘पितामह! वर द्यायचाच झाला, तर एक द्या. मृत्यूला हवं तेव्हा सामोरं जाणारं आणि प्रसंगी मृत्यूलाही तिष्ठत ठेवणारं आपलं बळ मला द्या. तेवढा एकच वर मला द्या. कारण, माझ्या एकमेव मित्राला द्यायला माझ्या प्राणांखेरीज माझ्याजवळ काहीही राहिलेलं नाही. रणवेदीवरील आत्मसमर्पण एवढंच आता शिल्लक राहिलं आहे. ते बळ मला लाभावं.’