मासाहेब, महाभारताचा प्रसंग अाठवा. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं : जिंकलंस, तर पृथ्वीचं राज्य भोगशील; मेलास, तर स्वर्गाचा मानकरी होशील. अाम्ही सल्ला केला, तरी प्राणनाश स्पष्ट दिसतो. युद्ध केलियाने जय जाहलियास उत्तम. प्राण गेला, तरी निदान कीर्ती तरी राहील.’