जिवाला जीव देणारी माणसं. वेळ का सांगून येते? घात, अपघात होतात. चुकून पाऊल फसतं. करमणुकीपायी असे मोहरे खर्ची टाकण्याची सवय आम्हांला नाही. आपल्या इच्छेखातर आम्ही येसाजीला पाठवला; पण तो माघारी येईपर्यंत आमच्या जिवात जीव नव्हता.’ त्या बोलांनी तानाशहांना राजांचे एक नवे दर्शन घडले.