या धरतीवर श्रींचं राज्य प्रस्थापित व्हावं, हे तुमचं ध्येय. ते काम श्रद्धेनं, प्रेमानं करणं हीच ईश्वरसेवा नाही का? राजे, सर्वांभूती प्रेम बाळगा. प्रजेवर उदंड प्रेम करा. धर्माची लाज राखा. महाराष्ट्रधर्म वाढवा. हीच तुमची तपश्चर्या. तिनंच तुम्हांला ईश्वर पावेल.’