‘माणसाचा प्रेमभंग होण्यापेक्षा त्याचं मुळातच कुणावर प्रेम न जडणं बरं नव्हे का?’ तो हसून उत्तरला, ‘छे! प्रेम माणसाला स्वतःच्या पलीकडे पाहायची शक्ती देतं. ते प्रेम कुणावरही असो, ते कशावरही जडलेलं असो. मात्र ते खरंखुरं प्रेम असायला हवं! ते हृदयाच्या गाभ्यातून उमलायला हवं! ते स्वार्थी, लोभी, किवा फसवं असता कामा नये. राजकन्ये, खरं प्रेम नेहमीच निःस्वार्थी असतं. निरपेक्ष असतं; मग ते फुलांवरलं असो, प्राण्यावरलं असो, सृष्टिसौंदर्यावरलं असो, आईबापांवरलं असो, प्रियकर किंवा प्रेयसी यांच्यावरलं असो, कुल, ज्ञाती, राष्ट्र यांच्यापैकी कुणावरलंही असो; निःस्वार्थी, निरपेक्ष, निरहंकारी प्रेम हीच माणसाच्या
...more