‘माणसाच्या जिभेला गोड फळं आवडतात. ती आपण तिला देत राहिलो, म्हणजे गोड फळांविषयी आपल्या मनात आसक्ती निर्माण होते. आसक्तीनं मनुष्य शरीरपूजक होतो. देहाची पूजा करणाऱ्याचा आत्मा बधिर होत जातो. फक्त विरक्तीनंच माणसाचा आत्मा जागृत राहतो. त्या विरक्तीसाठी मी ही कडू फळं मिटक्या मारीत खात असतो.’