काल-परवाचे ज्वलंत प्रश्न हे बेरीज-वजाबाकीच्या उदाहरणांइतके सोपे वाटावेत, अशा नव्या सामाजिक, राष्ट्रीय आणि जागतिक समस्या दत्त म्हणून पुढे उभ्या राहिल्या आहेत! अशा वेळी आजच्या कादंबरीकाराने कथासूत्राकरिता पुराणांकडे धाव घेणे हा वैचारिक पळपुटेपणा नाही का?