‘मानवी जीवनात आत्या हा रथी, शरीर हा रथ, बुद्धी हा सारथी आणि मन हा लगाम आहे. विविध इंदियं हे घोडे, उपभोगाचे सर्व विषय हे त्यांचे मार्ग आणि इंद्रियं व मन यांनी युक्त असा आत्मा हा त्याचा भोक्ता आहे.’ रथच नसला, तर धनुर्धर बसणार कुठं? तो त्वरेनं रणांगणावर जाणार कसा? शत्रूशी लढणार कसा? म्हणून व्यक्तीनं शरीररूपी रथाची किंमत कधीच कमी लेखता कामा नये.