मृत्युंजय
Rate it:
Kindle Notes & Highlights
28%
Flag icon
खरं आहे तुझं अश्वत्थामा, पण काही-काही लोकांकडे पाहिलं की, त्यांचं जीवन तू म्हणतोस त्याप्रमाणं दवबिंदूसारखं असेलसं वाटत नाही. ते कधीही सौख्याच्या हिंदोळ्यावर झुललेले नसतात! त्यांनी कधीच कोणते पराक्रम केलेले नसतात! जिवंतपणीच ते मृत झालेले असतात! त्यांना तू तुझ्या या कल्पनेत कुठं बसविणार? जीवनाला दवबिंदूची उपमा देऊन तू तुझी सौंदर्यदृष्टी व्यक्त केलीस, पण जीवन इतकं सहजसदृश्य नाही, सोपं नाही.’’ ‘‘नाही कर्णा, तू म्हणतास ते लोकसुद्धा दवबिंदूसारखेच असतात! केवळ हे दवबिंदू तृणपात्याच्या उलट्या बाजूला चिकटलेले असतात! त्यांच्यापर्यंत सूर्याचे दिव्य किरण पोहोचतच नाहीत! त्यांना प्रकाश मिळालेला नसतो. ...more
28%
Flag icon
‘‘मग त्यांनी लवकर आत्महत्या करावी, असंच तुझं सरळ-सरळ मत असेल?” ‘‘मुळीच नाही! जे जीवन मिळविण्याचा अधिकार नाही ते गमावण्याचाही अधिकार कुणाला नाही. आत्महत्या म्हणजे भावविवश मनाचा आत्म्यावर सरळ बलात्कार!” ‘‘मग अशा लोकांनी करावं तरी काय? केवळ मरेपर्यंत जगावं की, मरण जगत असताना जीवन जगत असल्याचं खोटं-खोटं ढोंग करावं?” ‘‘नाही! अशांनी सहनशील धरतीकडे पाहावं. तिच्यासारखी असंख्य आघात सहन करण्याची स्वत:ची शक्ती वाढवावी. शारीरिक, सांपत्तिक व लौकिक नव्हे; तर आत्मिक! आणि मगच योग्य वेळी अनंतात विलीन होऊन जावं. आत्म्याच्या संक्रमणाचे अनुभव समृद्ध करून जावं, कारण कुणीही कधीच विसरू नये की, काळ हा अखंड आहे. जीवन ...more
41%
Flag icon
पराक्रमाचं मातृत्व पुरुषाकडे असतं, पण मातृत्वाचा पराक्रम केवळ स्त्रीच करू जाणते!
57%
Flag icon
श्रद्धाहीन माणूस म्हणजे मात्र सुगंधी केवड्याच्या आत जीवनभर राहूनही गंधहीन झालेलं निरुपयोगी कणीस! अशा माणसानं शंभर वर्षांचं जीवन जगूनसुद्धा काहीही – खरोखरच काहीही मिळविलेलं नसतं!’’
57%
Flag icon
‘‘श्रद्धा! कशाकशावर ठेवावी माणसानं श्रद्धा? श्रद्धा म्हणजे तरी नेमकं काय?’’ त्याला चेतावून त्याची रसवंती फुलविणं हा माझा नित्याचा परिपाठ होता. ‘‘श्रद्धा म्हणजे काटेरी जीवनावरची हिरवळ! स्वत:वरच श्रद्धा हवी. ज्याची स्वत:वर – स्वत:च्या दिव्य स्वरूपावर श्रद्धा नाही तो जगासाठी, इतरांसाठी काहीच करू शकत नाही.’’
57%
Flag icon
“दुर्योधनानं पांडवांना राज्य देण्याबाबत प्रखर विरोध दर्शविला, हे राज्य केवळ कौरवांचंच आहे, पांडवांचं नाही अशी त्याची मनोमन श्रद्धा आहे म्हणूनच ना?’’ ‘‘मुळीच नाही! स्वार्थ म्हणजे स्वत:वरची श्रद्धा नव्हे! चूक होते ती नेमकी इथंच!’’ ‘‘स्वार्थ झाला तरी तो चूक कसा? निसर्गानंच तो विचार मानवाला दिला आहे की नाही?” ‘‘स्वार्थाची जाणीव ही चूक नसेलही, पण या जाणिवेला मर्यादा असावी लागते. एक जीभ या इंद्रियाचंच स्वरूप घे. एखाद्यानं ठरविलं की, जगात अस्तित्वात असलेल्या सर्व रसांचा आस्वाद घ्यायचा! अगदी मनसोक्त! आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी राक्षसी हव्यासानं तो एकसारखा जीवनभर धावत राहिला, तरी त्याला त्याचं जीवन ...more
57%
Flag icon
‘‘जीवनाचा उद्देश प्रकाश आहे; पण तो अगदी अंतिम असा उद्देश आहे! तो साध्य होण्यासाठी अनुभूतीची जरुरी आहे. निरनिराळ्या भावविभावांची अनुभूती! विविध अनुभव घेतल्यानंतरही ‘मी शोधतो आहे ते हे नव्हे!’ असं समजून आल्यानंतर मानव अंती आपल्या अंतरात्म्याकडे वळेल! त्याला तसं वळावंच लागेल! अटळ म्हणून स्वीकारावा लागणारा मानवजातीपुढचा अध्यात्म हाच एकमेव मार्ग राहील!’’