Chetan Badhe

26%
Flag icon
‘‘राजकारण म्हणजे काय, हे कर्णा, तुला कळतच नाही. तू तुझ्या कल्पनेप्रमाणं जगाकडे पाहायचा प्रयत्न करतोस, पण ते चूक आहे. राजकारण मनाच्या चांगुलपणावर कधीच चालत नसतं! ते बुद्धीच्या कसरतीवर चालत असतं! जग म्हणतं, भाषा‍ हे भावना व्यक्त करण्याचं साधन आहे, पण राजकारणात हीच भाषा‍ मनाच्या खऱ्या भावना अव्यक्त ठेवण्याचं साधन ठरतं! राजकारणी माणसाचं मन हे घुशीच्या बिळासारखं असावं. ते बीळ जसं कुठून सुरू होतं आणि कुठं जातं, हे कुणालाच कळत नाही; तसंच राजकारणी माणसाच्या मनात काय-काय आहे, हे कुणाला कधीही कळता कामा नये. राजकारण म्हणजे खुल्या मनानं चर्चा करावी असा मंदिरातल्या प्रवचनाचा विष‍य नव्हेच!’’
मृत्युंजय
Rate this book
Clear rating