व्यक्ती, मग ती कितीही श्रेष्ठ असो, त्यागी असो, योजनाकुशल असो तिच्यासाठी समाज कधीच थांबणार नाही! समाजाची अखंड गंगा वाहतच राहणार! आतील जलबिंदू बदलतील, आजचे जातील, उद्या नवे येतील, गंगा तशीच वाहत राहील. मी तरी माझं जीवन एवढं मोलाचं का मानावं? कुठल्याही व्यक्तीनं ते तसं कधीच मानू नये,