पुस्तकाबद्दल एका व्यक्तीची विलक्षण कथा. त्याच्याविषयीच्या दंतकथेने त्याला देव बनवून टाकले. ख्रि.पू. १९०० या काळात आधुनिक भारताची ओळख सिंधु संस्कृती अशी होती. त्या काळातील रहिवासी त्याला मेलुहाची भूमी म्हणत होते. कित्येक शतकांपूर्वी प्रभू रामाने या परिपूर्ण संस्कृतीची निर्मिती केली होती. पवित्र सरस्वती नदीचे पात्र हळूहळू कोरडे होऊन लुप्त झाल्यामुळे एके काळची स्वाभिमानी संस्कृती आणि सूर्यवंशींचे साम्राज्य धोक्यात आले. पूर्वेकडे असलेल्या चंद्रवंशींच्या साम्राज्याच्या प्रदेशातून त्यांच्यावर अनेक विघातक दहशतवादी हल्लेही झाले. याशिवाय आणखी वाईट गोष्ट म्हणजे चंद्रवंशींनी नागा लोकांशी हातमिळवणी करून हे हल्ले केल्याचाही सूर्यवंशीचा समज झाल