कर्नाटक मधील एका दुर्गम खेडेगावातील एका गरीब अडाणी बाईने आपल्या संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी काय-काय हाल सोसले, कसे भाषा येत नसताना परराज्यात येऊन अगणित संकटांना सामोरे जात आपल्या दोन मुलांना लहानाचे मोठे केले, कसे मुलांना योग्य संस्कार देण्याचा अज्ञान पूर्वक प्रयत्न केला आणि तिच्या संस्कारांचे संपूर्ण कुटुंबावर काय परिणाम झाले याची सत्य घटनेवर आधारीत ही प्रेरणात्मक कहाणी आहे. व त्याच माध्यमातून लेखकाने, आई-वडिलांचे संस्कार किती महत्वाचे असते, त्याचे त्यांच्या मुलांवर, समाजावर, आणि देशावर काय-काय परिणाम होते याबद्दल आपले मत मांडले आहे. आई-वडिलांच्या, शिक्षकांच्या, समाजाच्या, काही चुकीच्या संस्कारांचा लेखकाच्या विचारांवर, व्यक्तिमत्वावर, दैनंदिन प्रग