Jump to ratings and reviews
Rate this book

शोध सावरकरांचा

Rate this book

198 pages, Paperback

First published January 1, 1984

1 person is currently reading
12 people want to read

About the author

य.दि. फडके

3 books1 follower
ज्येष्ठ विचारवंत य. दि. फडके म्हणजेच यशवंत दिनकर फडके यांचा मराठी वाड़्कोशातून दिलेला परिचय.

यशवंत दिनकर फडके (३ जानेवारी १९३१)
महाराष्ट्राच्या आधुनिक कालखंडाचे इतिहासकार, चरित्रलेखक, विचारवंत. जन्म सोलापूर येथे. वडील स्वातंत्र्य चळवळीत. य. दिं.चे शिक्षण सोलापूरच्या प्रसिद्ध हरिभाऊ देवकरण हायस्कूलमध्ये झाले. वडिलांचे कुटुंबाकडे चळवळीमुळे दुर्लक्ष असल्यामुळे य. दिं. ना शिक्षणासाठी बरीच धडपड करावी लागली. शाळेत असताना त्यांनी द्वा. भ. कर्णिकांच्या संग्राम वृत्तपत्रात लेखन सुरू केले हेत. १९४७ साली ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठाची बी. ए. (१९५१) व एम. ए. (१९५३) ही पदवी त्यांनी मिळवली. १९७३ साली ' संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि काँग्रेस पक्ष ' या प्रबंधासाठी मुंबई विद्यापाठाने त्यांना पीएच. डी. पदवी दिली.

१९५४ ते १९६६ या काळात राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयांचे सुरूवातीला खासगी व नंतर शासकिय महाविद्यालयांत त्यांनी अध्यापन केले. १९६६ ते १९८० मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात प्रथम अधिव्याख्याता व नंतर प्रपाठक. १९८० ते १९८४ पुणे विद्यापीठात महात्मा गांधी अध्यासनाचे प्राध्यापक, १०८४ ते १९९१ टाटा समाजविज्ञान संस्थेत सामाजिक शास्त्रांचे प्राध्यापक य. दि. फडके यांची स्वतंत्र व संपादित अशी एकूण ६२ पुस्तके इंग्रजीत आहेत. त्यांचे ह बव्हंश लेखन विचावंतांच्या चरित्रांचा व कार्याचा तसेच आधुनिक महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासाचा वेध घेणारे आहे.

शोध बाळगोपाळांचा (१९७७), र. धों. कर्वे (१९८१), केशवराव जेधे (१९८२), शोध सावरकरांचा (१९८४), लोकमान्य टिळक आणि क्रांतीकारक (१९८५), विष्णूशास्त्री चिपळूणकर (१९८६), अण्णासाहेब लठ्ठे (१९९०), कहाणी सुभाषचंद्रांची (१९९४), आगरकर (१९९६) इत्यादी त्यांनी लिहिलेली चरित्रे पाहता एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते स्वातंत्र्य - प्राप्तीपर्यंतच्या कालखंडावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले. डॉ. आंबेडकर व त्यांचे कार्य हाही त्यांचा अभ्यासाचा विषय. डॉ. आंबेडकर आणि काळाराम मंदिर सत्याग्रह (१९८६), तसेच डॉ. आंबेडकर आणि इंडियन नॅशनल काँग्रेस (१९८६) तसेच डॉ. आंबेडकराचे मारकरी : अरुण शौरी (१९९९) ही त्यांची पुस्तके आहेत. विसाव्या शतकातील महाराष्ट्र (१९०१ ते १९४७) हा त्यांनी लिहिलेला महाराष्ट्राच राजकीय इतिहास पाच खंडातून प्रसिद्ध झालेला आहे.

सहाव्या खंडात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९६० पर्यंतच्या इतिहासाची मांडणी संकल्पित आहे. अस्सल कागदपत्रांच्या साहाय्याने, व्यक्ती वा काळ हा केंद्रबिंदू ठेवून राजकीय इतिहास उलगडीत जाणे य. दिं. च्या कार्याचे स्वरुप आहे त्यामुळे त्यांचे लेखन अस्सल दस्तावेजावर आधारलेले, ठाम आणि ठाशीव व नेमके असते. केवळ कागदपत्रांचे पुरावे घेऊन त्यांनी इतिहास मांडलेला नाही. त्यामागे त्यांची स्वत : ची अशी राजकीय व सामाजिक भूमिका आहे. सामाजिक समता, बंधुता व लोकशाही या तत्त्वांवर गाढ विश्वास असल्याने समतेच्या व लोकशाहीच्या हक्कांच्या चळवळीतला आपला वाटा उचलून ब्राम्हणेतर चळवळ व दलित चळवळ या सामाजिक इतिहासाची साधने त्यांनी गोळा केली आणि महात्मा फुले, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, शाहू महाराज, अण्णासाहेब लठ्ठे, डॉ. आंबेडकर या नेत्यांसंबंधी लेखन केले.

फडक्यांचे लेखन वस्तुनिष्ठ आणि नि : पक्षपाती, इतिहासकाराच्या भूमिकेवर ठाम राहूनच केलेले असते. स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबाराव सावरकर, सेनापती बापट, सुभाषचंद्र अशा क्रांतिकारकांच्या चरित्रांकडे ते वळले ते त्यांच्या राष्ट्रकार्यामुळे व त्यागामुळे. महात्मा फुले समग्र वाड्.मय (१९९१), तसेच जवळकर, सावरकर, केतकर यांच्या लेखनाचे संपादन ही फडक्यांची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. वैचारिकता आणि विश्लेषकता हे त्यांच्या लेखनात प्रतिबिंबित झालेले लक्षणीय पैलू आहेत. फडक्यांची काही पुस्तके ललित स्वरुपाची आहेत. दृष्टादृष्ट (१९९२), शोधता शोधता (१९९५), व्यक्तिरेखा (१९९८), स्मरणरेखा (१९९८), नाही चिरा नाही पणती (२०००), या पुस्तकांतून फडक्यांनी केलेले स्फुट लेखन आढळते. आजी, वडील, पत्नी असे आप्तस्वकीय, चित्रपटकलावंत, बालपणीच्या आठवणी यांसंबधीचे तसेच न. र. फाटक, आचार्य अत्रे, दत्तो वामन पोतदार, विश्राम बेडेकर, स. गं. मालशे, खाशाबा जाधव, अशा व्यक्तींवरचे त्यांचे लेखन त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील मार्दव, कलाप्रेम आणि वृत्तीची तन्मयता याचे दर्शन घडवणारे आहे.

इतिहासकार राजवाडे आणि रियासतकार सरदेसाई यांचा वारसा घेणारे इतिहास संशोधक, व्यासंगी विद्वान, चिकित्सक लेखक व संपादक अशा अनेक भूमिकांतून लेखन करणा-या फडक्यांनी १९६० नंतरच्या काळावर स्वत:ची नाममुद्रा उमटवलेली आहे. २००० साली बेळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते ब

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
0 (0%)
4 stars
1 (100%)
3 stars
0 (0%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
No one has reviewed this book yet.

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.